शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

उत्खननामुळे शेतकरी, वीट व्यावसायिकांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:06 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड माती उत्खनन प्रकरणामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या सात-बारापत्रकी साडेबारा कोटींचा बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतात असलेल्या वीट भट्ट्यांवरील एकही वीट उचलू देऊ नका, असा आदेश शेतकºयांना प्रांताधिकारी यांनी दिला आहे.त्यामुळे आपल्या सात-बारापत्रकी चढलेला बोजा कमी करण्यासाठी शेतकºयांची घाई सुरू झाली आहे, ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड माती उत्खनन प्रकरणामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या सात-बारापत्रकी साडेबारा कोटींचा बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतात असलेल्या वीट भट्ट्यांवरील एकही वीट उचलू देऊ नका, असा आदेश शेतकºयांना प्रांताधिकारी यांनी दिला आहे.त्यामुळे आपल्या सात-बारापत्रकी चढलेला बोजा कमी करण्यासाठी शेतकºयांची घाई सुरू झाली आहे, तर दुसरीकडे वीट भट्टीवरील वीट उचलू न देण्याच्या आदेशाने वीट व्यावसायिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.माती उत्खननप्रश्नी उदगाव-चिंचवाडच्या ७६ शेतकºयांच्या सात-बारावर सुमारे साडेबारा कोटींचा दंड चढविण्यात आला आहे, तर गेल्या तीन महिन्यांपासून उदगाव-चिंचवाडमधील असलेल्या वीट भट्ट्यांवरून विटाची विक्री होत होती, तर बुधवारी शिरोळ येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी एकही वीट व्यावसायिकांना उचलू देऊ नका अशा आदेशाने खळबळ उडाली आहे.तर शुक्रवारी उदगाव-चिंचवाडच्या सर्व शेतकºयांनी एकत्रित येऊन सर्व वीटभट्ट्यांच्या समोरील रस्त्यात जेसीबीच्या साहाय्याने चर काढून रस्ता बंद केला आहे. उदगाव व चिंचवाड परिसरात सुमारे दीडशेहून अधिक वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्ट्यावर कोट्यवधी रुपयांचा विटाचा मुद्देमाल आहे. सर्व शेतकºयांनी एकत्रित येऊन वीट वाहतूक बंद केल्याने वीट व्यावसायिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. शेतकरी आपली बाजू सोडविण्यासाठी आता कोणत्याही स्तरावर जाण्याच्या तयारीत आहेत. माती उत्खनन व वीटभट्ट्यांमुळे निसर्गरम्य वातावरण पूर्णत: गायब झाले आहे. या कारवाईचे निसर्गप्रेमींकडून स्वागत होत आहे. उदगाव-चिंचवाड माती उत्खनन करण्यासाठी रितसर रॉयल्टी भरलेल्या शेतकºयांनाही पाच ते सहापट दंड झाला आहे. हा दंड कमी करण्यासाठी तहसीलदारांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. तसेच रितसर आदेशानुसार कारवाई केली आहे. त्यामुळे रॉयल्टी भरलेल्या शेतकºयांचा कळीचा मुद्दा बनला असून आता जिल्हाधिकाºयांच्या निर्णयावरच पुढील निर्णय अवलंबून आहे.